राज्यातील कॅन्टोन्मेंटचे नगरपालिका आणि महापालिकांमध्ये विलिनीकरण, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

राज्यातील कॅन्टोन्मेंटचे नगरपालिका आणि महापालिकांमध्ये विलिनीकरण, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

मुंबई : पुणे, खडकी कटकमंडळ (Khadaki Cantonment) पुणे महापालिकेमध्ये, औरंगाबाद कटकमंडळ छत्रपती संभाजी नगर महापालिकेमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation), देवळाली आणि अहिल्यानग कटकमंडळ (Ahilyanagar Cantonment)स्वतंत्र नगरपालिकामध्ये, कामठी कटकमंडळ येरखेडा नगरपंचायतमध्ये समाविष्ट होणार आहेत. या कटकमंडळाचा महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थात समावेश झाल्याने नागरीसुविधा तसेच इतर विकास होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज बैठकीत सांगितले.

1 जुलैपर्यंतची मतदार यादीच स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी असणार; राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती 

विधानभवन (Legislative Assembly) येथे राज्यातील कटक मंडळांचे नगरपालिका, महापालिका क्षेत्रात विलिनीकरण करण्याबाबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषद सदस्य सिद्धार्थ शिरोळे, सरोज अहिरे, संग्राम जगताप, सुनिल कांबळे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, व्ही सी द्वारे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव, जिल्हाधिकारी पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीगर, अहिल्यानगर, पुणे दक्षिण कमांडचे संचालक संबंधित महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक संबंधित नगर परिषदांचे मुख्याधिकारी, पुणे, खडकी, देवळाली, छत्रपती संभाजी नगर, कामठी, अहमदनगर, देहू रोड कटक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील सराईत गुन्हेगार अहिल्यानगरमध्ये गजाआड 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेली अनेक वर्षे कटकमंडळ परिसरातील विकास कामांसाठी स्थानिक ठिकाणी मागणी होत असल्यामुळे केंद्र शासनाने नागरी भाग शेजारच्या महापालिका, नगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात पुणे, खडकी, देवळाली, छत्रपती संभाजी नगर, कामठी, अहिल्यानगर, देहू रोड येथे छावणी क्षेत्र आहे. प्रत्येक छावणीसाठी स्वतंत्र परिस्थिती आहे, हे लक्षात घेवून काही ठिकाणी थेट महापालिकेत समावेश करणे व काही ठिकाणी नवीन नगरपालिका स्थापन करावी लागणार आहे.

या कटकमंडळातील कर, वीज, पाणी आर्थिक प्रकरणे, कर्मचारी यांचे हस्तांतरण ही सर्व प्रकरण केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करण्यात यावीत. या कटकमंडळाचा महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थात समावेश झाल्याने नागरीसुविधा तसेच इतर विकास होण्यास मदत होणार आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.

जिल्हा नियोजनमधून कटकमंडळांच्या विकासासाठी निधी देणार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुणे, खडकी, देवळाली, छत्रपती संभाजी नगर,कामठी, अहिल्यानगर या कटकमंडळाचा समावेश झाल्याने जिल्हा नियोजनमधून या परिसराचा विकास करण्यासाठी शासनाकडून मदत करण्यात येईल. संबधित समाविष्ट नगरपालिका आणि महानगरपालिकांनी त्यासाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube